दुबई : आयपीएल 2020 चा अंतिम सामना आज मुंबई आणि दिल्ली यांच्यात रंगत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये आज कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली राजधानीने या विशेष सामन्यासाठी कोणतेही बदल केलेले नाहीत. मुंबई इंडियन्सने बदल केले आहे. शेवटच्या सामन्यात राहुल चहरला वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी जयंत यादवला संघात संधी देण्यात आली आहे. ट्रेंट बोल्टची दुखापत अधिक गंभीर नसल्याने तो देखील टीममध्ये आहे.


चार वेळा चॅम्पियन्स आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल दरम्यान तीन सामने खेळले गेले आहेत. यंदाच्या हंगामात चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांची टक्कर होईल, पण दिल्ली संघावर बराच दबाव असेल, कारण या मोसमात खेळल्या गेलेल्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये मुंबई संघाने दिल्ली संघाला चांगली टक्कर दिली आहे. दोनदा लीग टप्प्यात आणि एकदा क्वालिफायर वनमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्लीला पराभूत केले.


दिल्लीचा संघ


शिखर धवन, मार्कस स्टोईनिस, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमीयर, अक्षर पटेल, आर अश्विन, कॅगिसो रबाडा, एनरिक नोर्खिया आणि प्रवीण दुबे.


मुंबई इंडियन्स


रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, नॅथन कूलेटर नाईल, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.