मुंबई : सध्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं. पहिल्या वनडे सामन्यापूर्वी विराट कोहली जखमी झाला होता. त्याचवेळी तो पहिला वनडे खेळू शकणार नसल्याची चर्चा होती. यानंतर पहिल्या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर विराट अनुपस्थितीत असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय यावेळी रोहितने विराटचा विचार केला नसल्याचं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकल्यावर रोहितने विराटबाबत मोठी अपडेटही दिली. रोहितच्या म्हणण्याप्रमाणे, इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्याची निवड करताना टीम इंडियाने विराट कोहलीच्या नावाचा विचार केला नाही. कारण त्याला दुखापत झाली आहे. 


सोमवारी विराटला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळीच तो इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. 


दरम्यान कालच्या सामन्यापूर्वी रोहितने यावेळी सांगितलं की, "या सामन्यासाठी आम्ही विराट कोहलीचा विचार केला नाही, कारण त्याला दुखापत झाली आहे. त्याचबरोबर या सामन्यासाठी टीम निवडत असताना आम्ही युवा वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंगच्या नावाचाही विचार केला नाही. कारण त्याच्या ओटीपोटीमध्ये दुखतंय. 


या कारणांमुळे पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची निवड करताना आम्ही कोहली आणि त्याच्याबरोबरच अर्शदीप सिंग या दोघांच्या नावाचा विचार केला नसल्याचं, रोहितने सांगितलं.