नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी टीमकडे ३०९ रन्सची आघाडी असतांना देखील श्रीलंकेला फॉलोऑन नाही दिलं. भारतीय टेस्ट इतिहास असं दुसऱ्यांदा झालं आहे जेव्हा ३०० पेक्षा अधिक रन्सची आघाडी असतांना देखील विरुद्ध संघाला फॉलोऑन नाही दिला गेला.


याआधी असं फक्त एकदाच झालं आहे. २००७ मध्ये राहुल द्रविड कर्णधार असतांना देखील त्याने असंच केलं होतं.