मुंबई : भारताची टेनिस स्टार सनिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या विराट आणि अनुष्काला एक खास सल्ला दिला आहे.


सानियाचा सल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया मिर्झाने विराट आणि अनुष्काला मीडियाचा योग्य प्रकारे सामना करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मीडियापासून लांब इटलीमध्ये जाऊन लग्न केलं. लग्नाच्या 4 दिवसानंतर ही सोशल मीडियावर विरुष्का हे नाव(विराट आणि अनुष्काच्या नावापासून बनलेला) ट्रेंड करत आहे.


सानियाने म्हटलं की,  'मोठ्या लोकांच्या लग्नामध्ये थोडी जटीलता असते. कारण त्यांना बाहेरच्या जगाशी सुद्धा सामना करायचा असतो. त्यांचं लग्न फक्त स्वत:पुरता मर्यादित नसतं. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाह करणाऱ्या सानियाने म्हटलं की, 'त्यांना मीडियाबद्दल माहित होतं म्हणून ते इटलीमध्ये गेले. पण तेथून आल्यावर त्यांना याचा सामना करावाच लागेल.