India beats Pakistan : T20 World Cup च्या पहिल्या सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव केला. मेलबनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात (India Vs Pakistan) भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. भारताचा स्टार फलंदाज (Virat Kohli) विराट कोहलीने 82 धावांची वादळी खेळली आणि अखेरच्या षटकात भारताला विराट विजय मिळवून दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या (Virat Kohli) या अफलातून खेळीमुळे विराटचं जगभरातून कौतूक होताना दिसत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटचं कौतूक केलंय. अशातच आता भारताचा स्टार मिडल ऑर्डर फलंदाज सुर्यकुमार यादवने विराटला मनस्वी मानवंदना दिली आहे.


आणखी वाचा - India Vs Pakistan सामन्याची शेवटची ओव्हर, असा रंगला विजयाचा थरार...


सुर्यकुमार यादवने (uryakumar tweet on Virat Kohli) आजच्या सामन्यातील फोटो शेअर केले आणि विराटचं कौतूक करत त्याला मराठमोळं कॅप्शन दिलंय. सुर्यकुमार विराटला भाऊ असा शब्दाने बोलवतो. तसंच कॅप्शन त्याने दिलंय. 'मानलं रे भाऊ...' असं कॅप्शन देत सुर्याने विराटचं कौतूक केलंय.


पाहा ट्विट - 



दरम्यान, विराटने 82 धावांची वादळी खेळी केली. फक्त 53 चेंडूत विराटने पाकिस्तानच्या गोलंदाजांना नाचवलं. त्यात त्याने 6 चोकार तर 4 मॅचविनिंग षटकार देखील खेचले आहेत. तर दुसरीकडे सुर्याला आज खास चमक दाखवता आली नाही. एकेकाळी आयपीएलमध्ये विराटला खुन्नस देणाऱ्याने सुर्याने कौतूक केल्याने भारतीय चाहते देखील आनंदी असल्याचं पहायला मिळतंय.