मुंबई : T20 वर्ल्डकप 2021 आता शेवटच्या फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीसाठीचे संघ जवळपास निश्चित झाले आहेत. पण सर्वांच्या नजरा ग्रुप 2 मधील उरलेल्या सामन्याकडे लागल्या आहेत. रविवारी अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला हरवलं तर भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग खुला होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या गोष्टी नेट-रनरेट (NRR) वर अवलंबून असतात. पण हा नेट-रन रेट कसा चालतो आणि त्यामुळे जिंकणं किंवा हरण्यात काय फरक पडेल, ते आज समजून घेऊया!


कुठे पहायला मिळतं नेट-रनरेट?


क्रिकेटमध्ये, जेव्हा जेव्हा एखादी मोठी ICC स्पर्धा असते किंवा जिथे जास्त संघ एकत्र खेळत असतात (IPL, Big Bash, Asia Cup), तेव्हा नेट-रन रेटची मोठी भूमिका असते. सध्या टी-20 वर्ल्डकपमध्ये याची खूप मोठी चर्चा होतेय.


कोणत्याही संघाचा नेट-रन रेट कोणत्याही सामन्यात खेळल्या गेलेल्या दोन्ही डावांवर अवलंबून असतो. म्हणजेच फलंदाजी करताना डावात किती ओव्हर्स खेळल्या गेल्या, किती रन्स झाले, गोलंदाजी करताना किती ओव्हर्स किती धावा झाल्या, या आधारावर नेट-रन रेट काढला जातो. त्यानंतर दुसऱ्या डावाची सरासरी पहिल्या डावातून वजा केली जाते आणि नेट-रनरेट काढण्यात येतो.


नेट-रनरेट काढण्याचा फॉर्म्युला


एकूण केलेले रन / एकूण खेळलेल्या ओव्हर्स - एकूण गमावलेले रन्स / एकूण टाकेलेल्या ओव्हर्स = नेट रन रेट


उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या टीमने फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 120 धावा केल्या तेव्हा रनरेट 6 होतं. पण गोलंदाजी करताना 15 ओव्हर्समध्ये सर्व धावा गमावल्या, तेव्हा रनरेट 8 होतं. या प्रकरणात, निव्वळ रनरेट - 2.000 होईल. 20 ओव्हर्समध्ये 120 धावा केल्यानंतर, एखाद्या संघाने 20 ओव्हर्समध्ये केवळ 100 धावा दिल्या, तर त्याचा नेट-रनरेट + 1.000 असेल.


जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पूर्ण ओव्हर्स खेळल्या, परंतु दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारी टीम कमी धावसंख्येवर सर्वबाद झाली, तर त्याला नेट-रन रेटमध्ये पूर्ण ओव्हर्स खेळण्याचा फायदा मिळू शकतो. तसंच, संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक सामन्यासह नेट-रनरेट वाढत आणि कमी होत राहतं. जर एखाद्या टीमने पहिल्या सामन्यात चांगला खेळ केला आणि दुसऱ्या सामन्यात चांगला खेळ झाला नाही, तर त्याच्या स्पर्धेतील निव्वळ नेट-रनरेट फरक पडेल.