नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लग्नाचा विचार करतोय. कोहली डिसेंबरमध्ये लग्न करू इच्छित आहे. श्रीलंकाविरूद्ध कसोटी संघात कर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आल्यानंतरही बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्णधारसाठी देखील रोटेशन पॉलिसी लागू होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य निवडक एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले की कोहलीला ब्रेकची आवश्यकता आहे. प्रसाद यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की आम्ही त्यांच्यावरील कामाच्या वर्कलोडचा आढावा घेतला आहे. तो आयपीएलमधून सतत खेळत आहे. आम्ही देखील त्याला एक ब्रेक देण्याचा विचार करतोय. कसोटी मालिका झाल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल.


16 नोव्हेंबरपासून श्रीलंकाविरुद्ध टेस्ट मालिका सुरु होणार आहे. मात्र, बीसीसीआयने केवळ दोन कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी त्याच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. डिसेंबरमध्ये दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. जानेवारीमध्ये, भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करावा लागणार आहे. त्यामुळे विराट त्याआधीच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत.