मुंबई :  उद्या म्हणजेच 3 फेब्रुवारीला अंडर 19 संघाचा अंतिम मुकाबला रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाचा कर्णाधार विराट कोहलीने संघाला शुभेच्छा  देत भारत विजयी होणार असल्याचे भाकीत केले आहे.  


 विराट विजयाचे कारणही सांगितले  


 विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली 2008 साली अंडर 19 च्या संघाने वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळेच्या संघापेक्षा आजचा भारतीय संघ मजबुत असल्याने हा वर्ल्डकपदेखील आपण जिंकणार असल्याचे भाकीत त्यांने केले आहे.  शनिवारी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे.  


भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर 


सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. विराटच्या नेतृत्त्वाखाली सध्या सहा वन डे मॅच खेळले जाणार आहेत. दरम्यान यामधूनही वेळ काढून अंडर 19 चा अंतिम सामना पाहणार असल्याचे त्याने सांगितले आहे.  


पाकिस्तानवर मात  


सेमी फायनलमध्ये पाकिस्तानवर मात करून भारतीय संघ अंडर 19 च्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. अंतिम मुकाबला हा भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे.