मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवाग मंगळवारी ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयात हजर झाली. ज्यानंतर आरतीला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्हा कोर्टाने तिचा अजामीनपात्र वॉरंट रिकॉल अर्ज स्वीकारला. परंतु असं नक्की काय घडलं होतं, ज्यामुळे तिच्यावर ही वेळ आली, अशी लोकांमध्ये चर्चा होऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आता या मागील कारण समोर आलं आहे. खरेतर आरतीला चेक बाऊन्स प्रकरणी वॉरंट जारी करण्यात आलं होतं. 


आरती सेहवाग बराच वेळा कोर्टात गैरहजर होती, ज्यामुळे तिच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले. अधिवक्ता वीरेंद्र नागर यांनी या प्रकरणाबद्दल सांगितले की, चेक बाऊन्स प्रकरणी आरती सेहवाग जामिनावर होती, पण ती बराच काळ कोर्टात येत नव्हती. याआधी आरती सेहवाग 5 जुलै 2019 रोजी कोर्टात हजर झाली होती. त्यानंतर तिच्या वकिलानेही अर्ज केला नव्हता. ज्यामुळे तिला वॉरंट जारी करण्यात आले, मात्र आता न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


रिपोर्ट्सनुसार, आरती सेहवाग SMGK Agro Products या विविध फळ उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये शेअर होल्डर आहे. त्यांनी अशोक विहार, दिल्ली येथील एसएमजीके कंपनीने लखनपाल प्रमोटर्स अँड बिल्डर कंपनीकडून ऑर्डर घेतली होती, मात्र ती पूर्ण करता आली नाही.


यानंतर त्याला लखनपाल प्रवर्तकांना पैसे परत करावे लागले आणि एसएमजीकेने 2.50 कोटी रुपयांचा चेक दिला, परंतु तो बाऊन्स झाला. या अडीच कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात आरतीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.