चंद्रशेखर भूयार, झी मीडिया, बदलापुर : बदलापुरात पाणी समस्या तीव्र होत असतानाच कात्रप भागात जलवाहिनी फुटून रस्ता जलमय झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी तात्काळ या ठिकाणी पोहचले. त्यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाणी मात्र वाया गेले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास कात्रप भागात अंबरनाथ- बदलापूर रस्त्यावर मोनालीसा हॉटेलसमोरच्या रस्त्यावर ही मोठी जलवाहिनी फुटली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा उंचच उंच पाण्याचा कारंजा उडत होता. रस्त्यावरही पाणी पसरत होते. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कळविण्यात आले. त्यानुसार प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जलवाहिनिच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. एका जेसीबीचा धक्का लागल्याने येथील जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तुटून ही पाईपलाईन फुटल्याचे नागरिकांनी सांगितले.