भंडारा : जिल्ह्यातल्या तिरोडा तालुक्यात शेतात पाहाणी करताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दिवसांपासून पावसाने दडी दिली होती. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सेवकाराम बिसेन शेतातील पाणी वाहून जाऊ नये म्हणून भर पावसात शेतात बांध बांधण्यातकरिता गेले होते. मात्र तिथेच त्यांच्यावर वीज कोसळून त्यांचा दूर्देवी मृत्यू झाला.


याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.