कल्याण । विहिरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू

Thu, 01 Nov 2018-4:20 pm,

विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झालाय. यात दोन मुलं आणि फायरब्रिगेडच्या दोन जवानांचा समावेश आहे. कल्याण पूर्वेच्या नेतीवली लोकग्राम परिसरात ही दुर्घटना घडलीय. विहिरीत पडलेली दोन्ही मुलं स्थानिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या मुलांना विहिरीतून बाहेर काढताना फायरब्रिगेडच्या जवानांचाही मृत्यू झालाय. तर याठिकाणी मदतीला असलेला एक कर्मचारीही विहिरीत पडून मृत्यूमुखी पडलाय. ही मुलं विहिरीजवळ कशासाठी गेली होती याचा तपास सुरू आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link