सातारा । यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल - शरद पवार

Sat, 19 Oct 2019-10:44 am,

विधानसभा निवडणुकीत यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल, जनतेचा मूड वेगळा आहे. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. भाजपला कळून चुकले आहे, हे राज्य आपल्या हातातून जाणार आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इथे येऊन सभा घेतात. आपले मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघात जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले, इतर केंद्रीय मंत्री आलेत ते इथे पर्यटनासाठी फिरतायत का? यांना खात्री झाली आहे. हे राज्य आपल्या हातातून जाईल की काय, लोकांचा मूड आपल्याविरोधात आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे, असे प्रवार म्हणालेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link