मुंबई : दर महिन्याला येणारी पाळी ही प्रत्येक महिलेसाठी आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. या दिवसांमध्ये महिलांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेकदा हे त्रास जास्त वाढले की आपण डॉक्टरांचा सल्लाही घेतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांमध्ये तरुण मुलींना पाळी उशीरा येणं, पाळी महिन्यापेक्षा लवकर येणं त्याचप्रमाणे पाळीदरम्यान अधिक रस्तस्त्राव होणं अशा समस्या वारंवार दिसून येतात. दरम्यान वेळेच्या आधी पाळी येणं यामागे नेमकी काय कारणं असू शकतात हे आज आपण जाणून घेऊया.


विशिष्ठ डाएट 


अनेकदा वजन कमी करण्यासाठी आपण डाएट फॉलो करतो. डाएट फॉलो केल्यामुळे मासिक पाळी येण्याच्या वेळेत फरक पडतो. डाएटमुळे जर तुम्ही अचानक वजन कमी केलं तर मासिक पाळी लवकर येऊ शकते.  


काही औषधं


गर्भनिरोधक गोळ्यांचा मासिक पाळीवर परिणाम होतो. जर या गोळ्यांच्या वेळा दोन किंवा तीन वेळा चुकवल्या गेल्या तर मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता असते. शिवाय काही ठराविक प्रकारच्या औषधांमुळेही मासिक पाळी लवकर येऊ शकते.


रजोनिवृत्ती


जर तुम्ही वयाची चाळीशी ओलांडली असेल तर तो तुमचा रजनिवृत्तीचा काळ असतो. महिलांना रजोनिवृत्ती येण्याच्या अगोदरच्या काळात मासिक पाळीच्या चक्रात बदल जाणवतात. शिवाय पाळीच्या दिवसांत स्रावातही फरक जाणवतो. त्यामुळे रजोनिवृत्ती येण्याच्या काहीकाळ अगोदर महिलांना मासिक पाळी लवकर येते.  


तणाव


महिलांना असणाऱ्या मानसिक ताण-तणावामुळे देखील मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. त्यामुळे महिलांनी मासिक पाळी लवकर आल्यास घाबरून जाऊ नये.