मुंबई : कोरोना विरोधात भारतात लढाई सुरु आहे. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७०० च्या वर गेली आहे. तर १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच एका विद्यापीठाने भारताला धोक्याचा इशारा दिला आहे. येणारे काही महिने भारतासाठी कठीण असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अहवाल जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि द सेंटर फॉर डिसीज डायनेमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) यांनी तयार केला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या या अहवालात असे सांगितले गेले आहे की, भारतातील कोरोना विषाणूची भीतीदायक लाट जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या मध्यापर्यंत संपेल. यात पाच राज्यांचा आलेख देखील दर्शविला आहे.


एप्रिलच्या मध्यापासून ते मे दरम्यान संपूर्ण देशातील बहुतेक लोकांना कोरोनाची लागण होईल आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत ही संख्या कमी होत जाईल. हे ऑगस्टपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. या आलेखानुसार सुमारे 25 लाख लोकं या विषाणूची लागण झाल्यामुळे रुग्णालयात येतील.


अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, भारतात किती लोक संक्रमित आहेत हे माहित नाही. कारण बरेच लोक एकविरहित असतात. याचा अर्थ असा आहे की तेथे कोरोना विषाणूची लागण होणारे बरेच लोकं आहेत. त्यांच्यात कोरोनाचं सौम्य लक्षणे देखील आहेत. म्हणूनच, जेव्हा ते तीव्र होतील तेव्हाच हे कळेल.


जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, वृद्ध जनतेबाबत सामाजिक अंतरांची जास्त काळजी घ्यावी लागेल. जितके अधिक लॉकडाऊन असतील तितके लोकं यापासून दूर राहतील. लॉकडाऊन हाच सध्या मार्ग आहे.


सर्वात मोठी समस्या सांगण्यात आली आहे की, भारतात सुमारे 1 दशलक्ष व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल. पण भारतात फक्त 30 ते 50 हजार व्हेंटिलेटर आहेत. अमेरिकेत 1.60 लाख व्हेंटिलेटर आहेत परंतु ते कमी पडत आहेत. त्यांची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे.


या अभ्यासात असे म्हटले आहे की, पुढील तीन महिन्यांपर्यंत भारतातील सर्व रुग्णालयांना खूप कष्ट करावे लागतील. भारतालाही चीन आणि इतर देशांप्रमाणे तात्पुरती रुग्णालये तयार करावी लागतील. दुसरे म्हणजे, रुग्णालयांमधून संक्रमण पसरू नये याची काळजी घेतली पाहिजे.


भारतात सध्या सुरू असलेली तपास प्रक्रियाही संथ गतीने सुरू आहे. कारण जितकी अधिक तपासणी केली जाईल तितके अचूक निकाल सापडतील. योग्य प्रकारे तपासणी केल्यास कोरोना विषाणूची लागण झालेल्या वृद्ध लोकांना वाचवता येईल.


अभ्यासात असे सांगितले गेले आहे की, भारतात आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षणासाठी योग्य त्या सुविधा नाही. यामुळे वैद्यकीय कर्मचारीही धोक्यात येतील. यामुळे आरोग्य सुविधा कमी होतील.


जॉन हॉकिन्स यांनी केलेल्या अभ्यासानुसार असेही म्हटले आहे की काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची संख्या कमी आहे. परंतु लॉकडाउन होताच किंवा एक किंवा दोन आठवड्यांनंतर, प्रकरणे समोर येतील. मग समस्या आणखी वाढेल. 


बर्‍याच राज्यात हॉस्पिटल्स आणि आयसीयूमध्ये बेडची कमतरता आहे. ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असेल. ऑक्सिजन मुखवटे आणि व्हेंटिलेटर देखील भारतात कमी आहेत. यामुळे खूप त्रास होऊ शकतो.


तापमान आणि आर्द्रतेत वाढ झाल्याने विषाणूच्या संसर्गावर किंवा पसरण्यावर फारसा परिणाम होणार नाही, परंतु ते पुरेसे होणार नाही. कारण या विषाणूवर तापमानाचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही. (फोटो: रॉयटर्स)


अभ्यासामध्ये असे म्हटले गेले आहे की, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना या विषाणूपासून वाचवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तपासणी लवकर केला पाहिजे. जेणेकरून हे लवकर ओळखता येऊ शकेल की देशातील मुलांची या विषाणूमुळे काय़ स्थिती आहे.