इस्लामाबाद : कुख्यात दहशतवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या कूटनीतीला अखेर यश आले आहे. पाकिस्तान आणि चीनच्या वारंवार आडकाठीमुळे भारताची ही मागणी पूर्ण होत नव्हती. पण आता मसूद आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाल्याने त्यावर अनेक प्रतिबंध लागणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या दबावापुढे दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. मसूदवर तात्काळ बंदी लागू करु तसेच पुलवामा हल्ल्याशी संबंधित राजकीय संदर्भ हटवून आरोप सूचीबद्ध करण्यावर पाकिस्तान सहमत झाला आहे. संयुक्ट राष्ट्र संघाने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस यांच्या प्रस्तावानंतर चीनने तांत्रिक बाब हटवली. यानंतर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतावदी करण्याचा मार्ग मोकळा झाला.


मसूदचा संबंध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा नागरिक असलेला मसूद अजहरचा इतिहास जम्मू-काश्मीरपासून सुरु होतो. कंधार कांडमध्ये त्यानंतर पुलवामामध्ये झालेल्या दहशवतादी हल्ल्यात मसूदचा हात होता. मसूद अजहर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३० वर्षापासून भारत विरोधी कारवाया करत आहे. १९९४ मध्ये त्याला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आलं होतं. पण कंधार विमान अपहरण प्रकरणात त्याला सोडावं लागलं होतं. त्यामुळे भारतासाठी तो चिंतेचा विषय बनला होता.


भारतातून सुटल्यानंतर मसूद अजहरने जैश-ए-मोहम्मद नावाची संघटना तयार केली. त्यानंतर भारतात दहशतवादी कारवाया त्याने सुरु केल्या.



२००१ मध्ये संसदेवर हल्ला, २०१६ मध्ये पठानकोट हल्ला, २०१९ मध्ये पुलवामा हल्ला यामध्ये मसूदचा हात होता. संपूर्ण जग या दहशतवादी हल्ल्यामुळे हादरला होता. काश्मीरमध्ये अनेक छोट्या मोठ्या कारवाईंसाठी देखील मसूद जबाबदार होता.


जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा वाढत असल्याने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं ही एक मोठी घटना आहे. काश्मीरमध्ये इतर देशांनी हस्तक्षेप करावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करतो आहे. पण भारताने हे होऊ दिलं नाही.