नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्याबद्दल आभार मानले. त्यांच्या देशाला भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत. असे त्यांनी म्हटले आहे. शरीफ यांनी मात्र जम्मू आणि काश्मीरसह अन्य वाद शांततेत सोडवण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. मोदींच्या अभिनंदन संदेशाला उत्तर देताना शरीफ यांनी ट्विट केले की, 'पाकिस्तान भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध इच्छिते. जम्मू-काश्मीरसह अन्य वादांचे शांततापूर्ण निराकरण आवश्यक आहे. दहशतवादाविरुद्ध लढताना पाकिस्तानचे बलिदान सर्वश्रुत आहे. चला शांतता राखूया आणि आपल्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करूया.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी 70 वर्षीय शरीफ यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि म्हटले की, भारताला दहशतवादमुक्त प्रदेशात शांतता आणि स्थैर्य हवे आहे जेणेकरून आम्ही आमच्या विकासाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करू शकू आणि देशाच्या समृद्धी आणि समृद्धीकडे लक्ष देऊ शकू. आमचे लोक कल्याण सुनिश्चित करु शकू.' सोमवारी आपल्या भाषणात शरीफ यांनी काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.


हाय-व्होल्टेज राजकीय भांडणानंतर इम्रान खानची जागा घेणारे शरीफ म्हणाले की, त्यांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, परंतु काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय ते साध्य होऊ शकत नाही. तीन वेळा माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 


ऑगस्ट 2019 मध्ये भारताने जम्मू आणि काश्मीरचे विशेष अधिकार काढून घेण्याची आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले होते.