नवी दिल्ली : पाकिस्तानने काश्मीरी आणि खलिस्तानी दहशतवाद्यांचा नवा गट तयार केला आहे. या गटाला काश्मीर-खलिस्तान रेफरेंडम असं नाव दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतावरील हल्ले वाढवण्याचे आदेश पाकिस्तानच्या आयएसआयने कश्मीरी आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना दिले असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद माजवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतो आहे. त्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने काश्मीर आणि खालिस्तानी दहशतवाद्यांना एकत्र करत त्यांचा गट तयार करुन भारतात कारवाया करण्यासाठी तायरी केली आहे.


यूनायटेड किंगडम, कॅनडा आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये असलेले पाकिस्तानी उच्चायुक्त आणि दुतावास पाकिस्तानच्या अशा गटाला मदत करत आहेत.


भारतातून सीख श्रद्धाळू पाकिस्तानला जात असतात. या दरम्यान पाकिस्तान भारत विरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न करु शकतो. पाकिस्तान भारतातील लोकांना भडकवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो.