वॉशिंग्टन : गेल्या वर्षी मोदी सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतल्या बारक्ले विद्यापीठात बोलताना राहुल गांधींनी हे विधान केलंय. इंडिया @ 70 या विषयावर राहुल गांधींनी विद्यापीठात भाषण केलं.


यावेळी नोटाबंदीनं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. हा निर्णय घेताना मोदी सरकारनं देशातल्या कुणालाचा विश्वास घेतलं नाही. त्यामुळेच नोटाबंदी फसली असंही राहुल गांधींनी म्हटलंय.


याच भाषणात बोलताना राहुल गांधींनी देशात वाढणाऱ्या हिंसाचारावरही टीका केली.