शनिवार ठरला घातवार, वेगवेगळ्या अपघातात १२ जण ठार!

आजचा म्हणजेच शनिवारचा दिवस हा तब्बल दहा ते बारा कुटुंबियांसाठी अत्यंत निराशाजणक ठरला. तर, 'त्या' बारा जणांसाठी घातवार. 

Updated: Jan 13, 2018, 05:54 PM IST
शनिवार ठरला घातवार, वेगवेगळ्या अपघातात १२ जण ठार! title=

मुंबई : आजचा म्हणजेच शनिवारचा दिवस हा तब्बल दहा ते बारा कुटुंबियांसाठी अत्यंत निराशाजणक ठरला. तर, 'त्या' बारा जणांसाठी घातवार. आज (शनिवार, १३ जानेवारी) वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या अपघातात तब्बल १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

दिवस इतका घातक ठरला की, आज जमीन, पाणी आणि हवा अशा तीनही जागेवर अपघात घडला. डहाणू समुद्र किनाऱ्यावर ३६ जणांना घेऊन बोट बूडाली. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, ३६ जणांना वाचविण्यास यश आले. दुसरा अपघात डहाणू येथे घडला. हा अपघात हेलिकॉप्टर कोसळून घडला. यात चौघांचा मृत्यू झाला. 

तिसरा अपघात सांगली येथे घडला. सांगलीत क्रुझर आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात जण 6 ठार झाले. यांत 5 पैलवानांचा समावेश आहे.