भाज्यांचे दर कडाडले

राज्यात सर्वत्र गेल्या १५ दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने याचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. त्यातच नवरात्र असल्याने भाजीची मागणी वाढलीये.. मात्र भाज्यांची आवक थोडी मंदावलीये..

Updated: Sep 23, 2017, 08:58 AM IST
भाज्यांचे दर कडाडले title=

मुंबई : राज्यात सर्वत्र गेल्या १५ दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने याचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. त्यातच नवरात्र असल्याने भाजीची मागणी वाढलीये.. मात्र भाज्यांची आवक थोडी मंदावलीये..

६५० ते ७०० गाड्यांच्या जागी सध्या ४५० ते ५०० भाजीपाल्याच्या गाड्या मार्केटमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीचे भाव दुप्पट झालेत. भाजीचे भाव 70 ते 100 किलो पर्यंत गेलेत.