मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

किती दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिलो हे महत्त्वाचं नसून कसं काम केलं हे महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यामुळं आता चर्चेला उधाण आलंय. 

Updated: Sep 26, 2016, 10:52 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण title=

मुंबई : किती दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिलो हे महत्त्वाचं नसून कसं काम केलं हे महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यामुळं आता चर्चेला उधाण आलंय. 

मराठा मोर्चांमध्ये किंवा विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. त्यामुळं ही चर्चा भाजपमधल्याच लोकांनी सुरू केल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय. 

तर मुख्यमंत्र्यांच्या पदाला कोणताही धोका नाही. कोणतीही चुकी नसताना पदावरून हटवणं ही भाजपची संस्कृती नसल्याचं स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय.