सगळे राजकीय नेते मराठा आरक्षणाबाबत केवळ भूलथापा देतायत- प्रकाश आंबेडकर

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती झाली पाहिजे.

Updated: Jul 29, 2018, 04:52 PM IST
सगळे राजकीय नेते मराठा आरक्षणाबाबत केवळ भूलथापा देतायत- प्रकाश आंबेडकर title=

नाशिक| मराठा आरक्षणाविषयी गंभीरपणे चर्चा करण्याऐवजी राजकीय नेते भूलथापा आणि प्रसिद्धी देणारी वक्तव्ये करत आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते रविवारी नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती झाली पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणतात. मग त्यांनी नेमकी कोणती घटनादुरुस्ती झाली पाहिजे, हे मांडलं तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते, असे आंबेडकर यांनी सांगितले. 

दरम्यान, विरोधकांनीही सरकारच्या आरक्षण देण्याच्या दाव्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळायला हवं, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.