हाच तो दिवस! जेव्हा धोनी ब्रिगेडने पाकिस्तानला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप जिंकला

ICC T20 World Cup:मिडल ऑर्डरमध्ये सलामी देणाऱ्या मिसबाह-उल-हकने हरभजन सिंगच्या चेंडूवर तीन षटकार मारून स्पर्धा पुन्हा जिवंत केली आणि शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवल्या.

| Sep 24, 2023, 09:21 AM IST

ICC T20 World Cup: 1983 च्या विश्वचषक विजयानंतर टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय होता. या दिवशी जगाने टिम इंडियाची उल्लेखनीय कामगिरी पाहिली आणि प्रतिस्पर्ध्यांना टिम इंडियाच्या खेळाडूंची धडकी भरली.

1/10

हाच तो दिवस! जेव्हा धोनी ब्रिगेडने पाकिस्तानला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप जिंकला

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

ICC T20 World Cup: आजचा 24 सप्टेंबर हा दिवस प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी खास आहे. कारण 24 सप्टेंबर 2007 रोजी टीम इंडियाने क्रिकेटच्या इतिहासाला सुवर्ण अक्षरांनी आपली नोंद घेण्यास भाग पाडले. या दिवसापासून क्रिकेट विश्वास नव्या पर्वाची सुरुवात झाली. 

2/10

16 वर्षे पू्र्ण

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

बरोबर 16 वर्षांपूर्वी या दिवशी टिम इंडियाने संपूर्ण देशाला मोठे गिफ्ट दिले. तुलनेने अननुभवी पण आत्मविश्वासू कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली  टिम इंडियाने ICC T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली. 

3/10

गोड आठवणी

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील वांडरर्स येथे 'मेन इन ब्लू'ने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करून पहिला T20 विश्वचषक जिंकला.  त्यावेळी काय घडलं होतं याची गोड आठवण पुन्हा करुन घेऊया. 

4/10

टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

1983 च्या विश्वचषक विजयानंतर टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय होता. या दिवशी जगाने टिम इंडियाची उल्लेखनीय कामगिरी पाहिली आणि प्रतिस्पर्ध्यांना टिम इंडियाच्या खेळाडूंची धडकी भरली. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतील हा सर्वाधिक रोमांचकारी सामना ठरला. 

5/10

क्रिकेटप्रेमींचा उत्साह

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

टिम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 15 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत पाकिस्तानशी तारीख निश्चित केली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये क्रिकेटप्रेमींचा उत्साह उसंडून वाहत होता. 

6/10

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

त्यादिवशी टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सहा षटकांतच त्यांनी सलामीवीर युसूफ पठाण आणि तिसरा डाव रॉबिन उथप्पाला गमावले. असे असताना गौतम गंभीरच्या महत्त्वपूर्ण 54-बॉल-75 आणि रोहित शर्माच्या उशीरा नाबाद फट (16 चेंडूत 30) यांनी संघाचा धावफलक 157 रन्सपर्यंत नेला. 

7/10

157 धावांचा पाठलाग

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

वर्ल्ड कप फायनलमध्ये 157 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानची टिम मैदानात उतरली. पण त्यांना भारतीय बॉलर्सनी आपला चमत्कार दाखवत चक्रावून सोडले. धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. 

8/10

शेवटच्या शटकापर्यंत थरार

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

मात्र, मिडल ऑर्डरमध्ये सलामी देणाऱ्या मिसबाह-उल-हकने हरभजन सिंगच्या चेंडूवर तीन षटकार मारून स्पर्धा पुन्हा जिवंत केली आणि शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवल्या.

9/10

शेवटच्या षटकात 13 धावांची गरज

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

पाकिस्तानला शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती आणि एक विकेट शिल्लक होती. यावेळी धोनीने हकला बाद करण्यासाठी अननुभवी जोगिंदर शर्माकडे चेंडू सोपवला. यानंतर सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली. दरम्यान हकने शर्माच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर पाकिस्तानची विजयाच्या अधिक पोहोचली होती. 

10/10

ऐतिहासिक विजय

Team India won ICC T20 World Cup 2007 against Pakistan Cricket History

मात्र, पुढच्या चेंडूचा मिस्बाह उल हकला अंदाज लावता आला नाही. त्याने  स्कूप खेळला पण तो श्रीशांतच्या हातात गेला. आणि भारताने पाच धावांनी ऐतिहासिक  विजय नोंदवला. भारतीय संघाने पहिला ICC T20 विश्वचषक जिंकला आणि हा ऐतिहासिक विजय जगभरातील खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांच्या मनात अजूनही ताजा आहे.