उमेदवारांचे हाल

रत्नागिरीतील सैन्यभरतीत उमेदवारांचे हाल

 रत्नागिरीत सध्या सैन्यभरती सुरु आहे. मात्र उमेदवारांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन मात्र एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहे. मुंबईतील पोलीस भरतीच्यावेळी जे उमेदवारांचे हाल झालेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला होता. ही गोष्ट धान्यात घेवून भाजपने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी मोफत खिचडी वाटप केले. तर शिवसेनेने त्यांना अन्यबाबतीत मदत केली.

Feb 11, 2015, 07:56 PM IST