नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले

Indian Ocean Gravity Hole Location: भारतातील हिंद महासागराच्या मधोमध एक खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्याचे रहस्य शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 31, 2024, 12:00 PM IST
नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले title=
gravity hole in indian ocean scientists find reason behind it

Indian Ocean Gravity Hole Location: समुद्राच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. जी उलगड्यासाठी सर्वसामान्य माणसांबरोबरच वैज्ञानिकांनाही अद्याप हे गूढ उकलण्याची उत्सुकता आहे. आपल्या भारतातही असंच एक रहस्य आहे. ज्याची उकल करण्याचा कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. अखेर त्या प्रयत्नांना आता यश आले आहे. हिंद महासागराच्या मधोमध एक मोठा खड्डा आहे. या खड्ड्याला ग्रॅव्हिटी होल असं नाव देण्यात आलेले आहे. हा खड्डा नेमका कसा निर्माण झाला. महाकाय समुद्राच्या मधोमध तयार झालेल्या या खड्ड्याला नरकाचा दरवाजा असंही म्हटलं जात होतं. मात्र, हा नेमका काय प्रकार आहे? याचा शोध वैज्ञानिकांनी घेतला आहे. 

ग्रेव्हिटी होल हा हिंद महासागरात निर्माण झालेली अनोखी रचना आहे. या भागात गुरुत्वाकर्षण इतकं कमी आहे की पाण्याचा स्तर 328 फूट खाली गेला आहे. त्यामुळंच समुद्रात हा महाकाय खड्डा बनला आहे. संधोकांच्या एका टीमने म्हटलं आहे की, पृथ्वीच्या भूगर्भात असलेल्या लावामुळं हा खड्डा निर्माण झाला आहे. हा तोच मॅग्मा आहे जो ज्वालामुखीच्या उद्रेकासाठी कारणीभूत असतो. संशोधकांच्या एका पथकाने या रहस्याची उकल करण्यासाठी सुपर कंम्युटरचा वापर केला आहे. यातून मिळालेल्या गणनावरुन सिद्ध झाले आहे की समुद्रातील हा खड्डा तब्बल 14 कोटी वर्षांपूर्वीच निर्माण झाला आहे. अभ्यासात सापडलेले परिणाम जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. संशोधकांनुसार, एका प्राचीन महासागरामुळं ही संरचना तयार झाली होती मात्र तो महासागर अस्तित्वात नाहीये. 

1948मध्ये हा विशालकाय खड्डाच्या शोध लागला होता. तेव्हापासून याचे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील होते. मात्र, त्यांना आता कित्येक वर्षांनंतर यश मिळाले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे गूढ आतापर्यंत सोडवले गेले नाही कारण याकडे भौतिकशास्त्राच्या नियमाच्या आधारे पाहिलं जात होतं. पाच सुपक कम्पुंटरचा वापर करुनच शास्त्रज्ञांनी गेल्या 140 दशलक्ष वर्षात या ठिकाणी टेक्टोनिक प्लेटची हालचाल झाली होती, हे शोधून काढले आहे. 

सुपर कम्युंटरच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना आढळले की, गुरुत्वाकर्षणामुळं लो डेन्सिटी प्लाज्मा प्लूम्स या ग्रेव्हिटी होलच्या खालील भागातून बाहेर येत आहेत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, करोडो वर्षांपूर्वी भारत कधीतरी अफ्रिका खंडाचा एक भाग होता. मात्र कालांतराने तो वेगळा होऊन युरेशियन टेक्टोनिक प्लेटच्या दिशेने सरकला. हा भाग पुढे सरकत असतानाच प्राचीन टेथिस समुद्राचा सागरी तळ आच्छादनाखाली येऊ लागला. अशा प्रकारे हिंदी महासागर तयार होऊ लागला. नंतर टेथिसची समुद्र पातळी वितळू लागली. कोट्यवधी वर्षांपासून साचत असलेल्या उच्च घनतेच्या आवरणाच्या वितळल्यामुळे कमी घनतेचे प्लाझ्मा प्लम्स बाहेर येऊ लागले. यामुळेच याच्या खालच्या भागात जगातील इतर समुद्रासारखी घनता नाही आणि येथील पाण्याची पातळी इतर ठिकाणांपेक्षा कमी झाली आहे.