Sonia Sahni: मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांच्या आयुष्यातील गुपितं समोर येत असतात. सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्यातीलही गुपितांबद्दल (Entertainment Gossips) अनेकदा चर्चा केली जाते. कधी त्यांच्या लव्ह अफेअर्सबद्दल तर कधी त्यांच्या घटस्फोटांबद्दल. सेलिब्रेटी हे कायमच चर्चेत असतात त्यातून बॉलिवूड सेलिब्रेटींची तर दिवसा-रात्री चर्चा होत असते. सध्या अशाच एका सेलिब्रेटी अभिनेत्री सध्या सगळीकडेच चर्चा आहे. 70-80 च्या दशाकातील असे अनेक सिनेमे (Celebrity Relationships) आहेत ज्यांची आजही चर्चा होताना दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या काळातही अशा अनेक अभिनेत्र्या होत्या ज्यांची सगळीकडेच जोरात चर्चा राहिली आहे. त्यातील एका अभिनेत्रीचे आयुष्य मात्र अनेकदा चर्चेत राहिली आहे. सध्या त्या अभिनेत्री पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नक्की त्यांच्या आयुष्यात असं काय घडलं होतं की त्या एका घटनेनं मात्र त्यांचे आयुष्य मात्र उद्धवस्तच झाले. 


या अभिनेत्रीचं नावं आहे सोनिया साहनी (Sonia Sahni). 70-80 च्या दशकातील त्यांचे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. त्या काळी त्यांची खूप मोठ्या प्रमाणात क्रेझही होती. त्या त्यांच्या सौंदर्यांसाठी ओळखल्या जायच्या. परंतु नंतर त्यांच्या आयुष्यात जे काही घडलं ते फार धक्कादायक होते. त्यांना या इंडस्ट्रीतून चांगली ओळख मिळाली त्याचबरोबर त्यांना मोठा सन्मानही मिळाला परंतु त्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्या आयुष्यात वेगळेच बदल झाले. त्यांनी आपल्या प्रेमासाठी धर्मांतरही केले त्याचबरोबर त्यांचे लग्नही केले होते. परंतु त्यांचे प्रेम मात्र काही टिकले नाही. 


त्यांचे करिअर जेव्हा फुलू लागले होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या एका चित्रपटातून त्यांनी किसिंग सिन (Kissing Scene) दिला होता. हा सीन त्यांनी आईएस जौहर नावाच्या एका अभिनेत्यासोबत दिला होता. या सीननंतर त्यांचा खूप गाजावाजा झाला. त्यांना आपल्या आयुष्यातील 34 वर्षे या फिल्म इंडस्ट्रीसाठी दिली आहेत. 


सोनिया साहनी यांनी लग्नासाठी धर्मांतर केले आहे. सोनिया या आपल्या करिअरच्या पीकवर असताना शिव पलिताना यांच्यावर प्रेम करू लागल्या होत्या. पलिताना यांचा संबंध हा राजघराण्याशी होता. त्यांचे संपुर्ण नाव शिवेंद्र सिंग गोयल असे होते. समोर आलेल्या माहितीनुसार, सोनिया यांच्या परिवाराकडून त्यांच्या लग्नाला फार मोठा विरोध होता. असे म्हटले जाते की, शिव हे याअगोदरच विवाहित होते आणि त्यांना एक अपत्यही आहे. 


लग्नानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात वादळंच आली. त्यांच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यामुळे त्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. अशी माहिती कळते की, त्यांच्या पतीच्या निधनानंतर मात्र त्यांच्या सासरच्यांकडून त्यांचा खूप छळ झाला आणि मेन्टंलीही खूप टॉर्चर करण्यात आले.