मुंबई : झगमगत्या विश्वात असे अनेक जोडपे आहेत, जे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत आसतात. अशा जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन. ऐश्वर्या आणि अभिषेक कयम एकत्र दिसतात. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. लग्नाच्या 14 वर्षानंतरही ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांमधील बॉन्डिंग खूपच मजबूत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत त्यांच्यात कोणतेही गंभीर भांडण झाले नाही, परंतु अनेक वेळा त्यांच्यात भांडण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण एक असा दिवस आला जेव्हा अभिषेकवर रागावलेल्या ऐश्वर्याने दोन दिवस पत्नीला बेडरूममधून बाहेर ठेवलं. आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या आणि अभिषेकचा असाच एक किस्सा सांगणार आहोत. 



अभिषेक बच्चनला त्याच्या एका चुकीमुळे पत्नी ऐश्वर्याच्या रागाचा सामना करावा लागला होता. एकदा अभिषेक बच्चन त्याचा कबड्डी संघ 'जयपूर पिंक पँथर्स'ला प्रशिक्षण देण्यासाठी चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठात गेला होता. तेव्हा तेथे पोहोचल्यानंतर अभिषेकने विद्यापीठाचे संस्थापक कर्नल जेपीआयआर यांची भेट घेतली. कर्नलची जीवनशैली पाहून अभिषेक बच्चन थक्क झाला. एका छोट्याशा खोलीत आयुष्य जगणाऱ्या कर्नल यांनी अभिषेकच्या मनावर आपली छाप सोडली.


एवढंच नाही तर कर्नल यांनी त्यांचे सर्व पुरस्कार ऑफिसमध्ये जमीनीवर ठेवले होते. असं चित्र पाहून अभिषेक थक्क झाला. अभिषेकने कर्नल यांना या मागचं कारण विचारलं, तेव्हा ते म्हणाले, 'माझ्या या पुरस्कांरांचा परिणाम माझ्यावर होवू नये, म्हणून मी ते केले.' अभिषेक बच्चनला त्यांचे उत्तर आणि त्याची पद्धत खूप आवडली.


घरी परतल्यानंतर अभिषेक बच्चननेही तो प्लॅन फॉलो केला. त्याने आपल्या ऑफिसच्या ट्रॉफीही जमिनीवर ठेवल्या, पण हे सर्व पाहून ऐश्वर्या खूश झाली नाही तर रागाने लाल झाली. ऐश्वर्याने रागाने अभिषेकला बेडरूमबाहेर काढले. अशा परिस्थितीत अभिषेकला दोन रात्री घराच्या हॉलमध्ये झोपून काढावे लागले.