Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार पहिल्यापासून महिलांच्या प्रश्नांवर मोकळेपणाने बोलताना दिसला आहे. अलीकडेच त्याचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तो लग्नानंतरच्या महिलांच्या करिअरबद्दल आपले मत मांडत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारने लग्नानंतर अभिनेत्रींचे काय होते हे सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार त्याचा अनुभव शेअर करताना म्हणाला की, 'मला असं वाटत नाही पण मुळात असं होतं की लग्नानंतर अभिनेत्री काम करणं बंद करतात किंवा त्यांचा नवरा काम करणं थांबवतो. म्हणूनच अभिनेत्री इंडस्ट्री सोडतात किंवा निघून जातात. गेल्या काही वर्षांमध्ये मी इंडस्ट्रीमध्ये हेच बघत आलो आहे.


विवाहित अभिनेत्रींना अक्षयने काय दिला सल्ला? 


अक्षय कुमार म्हणाला की, 'मला वाटते की ती अजूनही पुढे जाऊ शकते. तिने तिच्या फिगर मेंटेन ठेवली पाहिजे. शेवटी ती अभिनेत्री आहे. ती पुढे जाऊ शकते. इतकी वर्षे ती पुढे जात आहे. लग्नानंतरही ती पुढे जाऊ शकते आणि लग्नानंतरही अनेक अभिनेत्री आहेत ज्या स्वत:ला खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात.


लग्नानंतरही अभिनेत्री त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतात. असा विचार व्यक्त करून अक्षय कुमारच्या या विधानाने 1990 च्या दशकात चित्रपटसृष्टीतील लैंगिक भूमिकांबाबत महत्त्वाचा संवाद सुरू झाला.


ट्विंकल खन्नाचे युटूब चॅनेल


अभिनेता अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर देखील ट्विंकल खन्नाने तिचे काम सुरु ठेवले होते. जरी ट्विंकल चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी, तिने स्वतःचे 'Tweak India'नावाचे युटूब चॅनेल सुरु केले. ट्विंकल खन्नाची ही डिजिटल मीडिया कंपनी आधुनिक भारतीय महिलांना वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्याची आणि त्यांची मते मांडण्याची संधी देते.