Alia Bhatt and Rashmika's Viral Video :  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सगळीकडे फक्त याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आलिया आणि तिचं कुटुंब हा शो पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी त्यांची भेट दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री आणि रणबीरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी रश्मिका मंदाना त्यांना भेटली. या कार्यक्रमात आलियाच्या लूकनं तर सगळ्यांचे लक्ष वेधलेच, मात्र त्यासोबतच तिनं रश्मिकाला ज्या प्रकारे मिठी मारली त्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया आणि रश्मिकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इंस्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. रश्मिकाला पाहताच आलिया रश्मिकाला मिठी मारण्यासाठी थांबली. अनेक नेटकऱ्यां आलियाचं असं रश्मिकाला मिठी मारणं वेगळं वाटलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं अनेकांनी पाहिला आणि त्यावर विविध कमेंट देखील केल्या. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं की 'असं विचित्र प्रकारे मिठी मारण्यात काय अर्थ आहे?' दुसरा नेटकरी म्हणाला की 'आलियानं असं तोंड का केलं?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ती तिच्या डोळ्यांकडे पाहतच नाही.' तर आणखी एक नेटकरी म्हणाला, 'फुकटचा अॅटिट्यूड.' काही नेटकऱ्यांनी आलिया पत्नी असल्यानं तिनं असं केलं आहे. 'ईर्षा असल्यानं आलियानं असं केलं,' असं आलियानं केल्याचं एक नेटकरी म्हणाला. तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'पत्नी अखेरीस पत्नीच असते. आपल्या पतीसोबत काम करणारी महिला त्यांना आवडत नाही.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पहिल्या दिवशी केली किती कमाई? 


Sacnilk नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 'ॲनिमल' नं भारतात पहिल्या दिवशी 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटानं वर्ल्ड वाईड 100 कोटींचा आकडा पार केला आहे. तर विकेंड सुरु झाल्यानं या चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होण्याची आशा निर्मात्यांना आणि रणबीरच्या चाहत्यांना आहे. शनिवारी हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


हेही वाचा : Animal Box Office Collection Day 1 : पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' नं केला 100 कोटींचा आकडा पार!


 चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर बॉबी देओल हा खलनायकाच्या भूमिकेत आहे.