मुंबई : 'दिल हसते हसते रो पडा...' ओळीने सुरू झालेले 'बदला' सिनेमातील नवीन गाणे खुपच भावूक आहे. 'तू ना आये' असे या गाण्याचे नाव आहे. अतिशय भावूक असलेल्या या गाण्याच्या ओळी खूप काही सांगत आहेत. अमल मलिक यांनी गाण्याला संगीत दिले आहे. जेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहेत. एका रहस्यमय कथेवर बेतलेला हा सिनेमा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


'बदला' सिनेमाची कथा उद्योजक महिला नयनाच्या जीवनावर आधारलेली आहे. हॉटेलमध्ये नयना तिच्या प्रियकराच्या मृतदेहासोबत बंद खोलीत आढळते. तेव्हा नयना स्वत:ला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी एका प्रतिष्ठित वकिलाची निवड करते. वकील आणि नयना सत्याचा शोध घेताना दिसत आहेत. 


'माफ कर देना हर बार सही नहीं होता' अशी टॅग लाइन असलेला 'बदला' सिनेमा गौरी खान, सुनीर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी 'रेड चिली एन्टरटेन्मेट' बॅनरखाली निर्मित केला आहे. 'बदला' सिनेमा 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कॉन्ट्राटिएम्पो' या स्पॅनिश सिनेमाची रिमेक असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले असून सिनेमा 8 मार्च रोजी सिनमागृहात दाखल होणार आहे.