मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन काही दिवसांपूर्वीच कान्स चित्रपट महोत्सवासाठी रवाना झाली. यावेळी मुलगी आराध्या आणि पती अभिषेक बच्चन हेसुद्धा तिच्यासोबत होते. कान्ससाठी रवाना झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याचा रेड कार्पेड लूकमधील फोटो चाहत्यांसमोर आला. (aishwarya rai bachchan )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भल्याभल्या अभिनेत्रींच्या फॅशन सेन्सला ऐश्वर्याच्या स्टायलिश लूकनं धूळ चारली, असंच म्हणावं लागेल. रेड कार्पेटवर चमकणारी ही सौंदर्यवती जवळपास गेल्या 4 वर्षांपासून चित्रपटांमध्ये झळकली नाही. (aishwarya rai bachchan cannes 2022)


इतकी वर्षे ऐश्वर्या चित्रपटांपासून दूर का? असा प्रश्नही अनेकांना पडला, पण तोसुद्धा मागे पडला. अखेर कान्सच्याच मंचावर खुद्द ऐश्वर्यानं ती कलाजगतापासून इतकी वर्षे दूर का होती, यामागचं कारण स्पष्ट केलं. 


मागील 4 वर्षांमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित न होण्याबद्दल सांगताना तिनं स्वत:ला proverbial tortoise असा टॅग दिला. मागील दोन वर्षांमध्ये जे काही घडलं तो आपण सर्वांसाठीच एक नैसर्गिक विराम होता, असं ती म्हणाली. 


मी कायमच वास्तववादी असते. माझं खरं रुप हेच आहे. माझं प्राधान्य याच गोष्टीला असेल. कायमच प्रत्यक्ष आयुष्याला आणि वर्तमानातील घडामोडींना माझं महत्त्वं असेल, असं ऐश्वर्यानं स्पष्ट केलं. 



मी कधीच कोणत्या आशेवर जगले नाही, असं म्हणत जेव्हा नैसर्गिक संकट (कोरोनाची साथ) संपूर्ण जग झेलत होतं अशा वेळी या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा पुरेसा वेळ मला मिळाला यातच मी आनंदी आहे. दोन वर्षांचा काळ पाहून मी घाबरून गेले नाही, असं म्हणत तिनं स्वत:चा दृष्टीकोन जगासमोर ठेवला. 


ऐश्वर्यानं दिलेली ही कारणं आणि तिचा वेगळा दृष्टीकोन पाहता एक अभिनेत्री असण्यासोबतच संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती म्हणून ती किती परिपक्व आहे हेच सर्वांनी जाणलं.