मुंबई : सुशांतसिंग राजपूतप्रकरणी माझ्यावर होत असलेले आरोप हे घाणेरडं राजकारण असल्याचं शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या या स्पष्टीकरणावर बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने टीका केली आहे. 'घाणेरड्या राजकारणाविषयी कोण बोलतंय बघा? तुमचे वडिल मुख्यमंत्री कसे झाले, ही घाणेरड्या राजकारणाची केस स्टडी आहे. ते सगळं विसरा आणि तुमच्या वडिलांना याबद्दलचे काही प्रश्न विचारा,' असं ट्विट कंगनाने केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



कंगनाचे प्रश्न 


१) रिहा चक्रवर्ती कुठे आहे?


२) सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी एफआयआर का घेतली नाही?


३) सुशांतच्या जीवाला धोका असल्याची तक्रार फेब्रुवारीमध्ये दाखल केल्यानंतरही मुंबई पोलीस पहिल्या दिवशीच ही आत्महत्या आहे, हे कसं म्हणत होते?


४) आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट का नाहीत? सुशांतचा खून झाला त्या आठवड्यात तो फोनवर कोणाशी बोलला याचा डेटा का नाही?


५) आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाईनच्या नावावर बंदिस्त का ठेवण्यात आलं?


६) रिहा आणि तिच्या कुटुंबाने सुशांतचे पैसे का लुटले?


या प्रश्नांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे याची उत्तरं द्यावीत, अशी मागणी कंगना राणौतने केली आहे. 


बॉलीवूडमधील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध असणे हा काही गुन्हा नाही- आदित्य ठाकरे