नवी दिल्ली : सध्या कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या आगामी चित्रपट फिरंगीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी त्याने अनेक टीव्ही शो मध्ये हजेरी लावली. त्याचदरमान्य त्याला अक्षय कुमारचा टीव्ही शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये जायचे होते. मात्र कपिल या शो मध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रिपोर्टनुसार कपिलला अक्षयच्या शो मध्ये मंगळवारी जायचे होते. त्यासाठी सगळी तयारी देखील झाली होती. सहमतीने कपिल येणार असे असताना देखील शूटिंग चालू होईपर्यंत कपिल तेथे पोहचू शकला नाही. टीमने खूप वेळ कपिलची वाट बघितली आणि त्यानंतर त्यांनी शूटिंगला सुरुवात केली. मात्र कपिल नंतर तरी येईल अशी आशा सर्वांना होती. परंतु, तसे झाले नाही. कपिल आलाच नाही. तब्बेत ठीक नसल्याचे कपिलने कळवले. 


 त्यानंतर मात्र ‘द ग्रेट लाफ्टर चॅलेंज’ची टीम काहीशी नाराज झाली. तरी देखील त्यांनी कपिल लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. खरंतर हे वर्ष कपिलसाठी तितकेसे चांगले राहिले नाही. सुरुवातील सुनील ग्रोवर सोबतचा वाद चांगलाच रंगला. त्यानंतर त्याची तब्बेत खूप बिघडली. त्यामुळे अनेकदा शूटिंग कॅन्सल करावे लागले. तब्बेत सांभाळण्यासाठी त्याला त्याचा शो देखील बंद करावा लागला. 


 मात्र 'फिरंगी' चित्रपटाकडून त्याच्या आणि चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. अलीकडेच कपिलने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानच्या बिग बॉस मध्ये हजेरी लावली. तिथे त्याने खूप मज्जा मस्ती केली. 


 २०१५ मध्ये कपिलचा  ‘किस किसको प्यार करूं' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २ वर्षांनी कपिल फिरंगी मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून यात इशिता दत्ता आणि मोनिका गिल देखील आहेत.