मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये मतभेद होणं ही काही मोठी गोष्ट नाही. सेटवर बर्‍याचदा एकत्र काम केल्यामुळे दोन अभिनेत्रीमध्ये भांडण आणि बर्‍याचदा मतभेद निर्माण झालेले असतात. पण अशा दोन अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं होतं. यांच्यामध्ये एवढं भयंकर भांडण झालं की, अभिनेत्री सेटवर जोरजोरात रडु लागली. आपण बोलत आहोत अभिनेत्री मनीषा कोईराला आणि ऐश्वर्या राय यांच्यातील भांडणाबद्दल. होय, ऐश आणि मनीषा यांच्यात एवढे वाद निर्माण झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय आणि सलमानच्या अधूरी लव्हस्टोरी बरीच चर्चेत होती. पण ऐश सलमानच्या अगोदर दुसर्‍या कुणला तरी डेट करत होती, हे मनीषाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. मनीषा कोइरालाने ऐश्वर्या राय आणि प्रसिद्ध मॉडेल राजीव मूलचंदानी यांचं नावं जोडलं. मनीषा कोइराला यांनी ऐशच्या लग्नानंतर दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं होतं.. या मुलाखतीनंतर ऐश्वर्याने देखील तिला उत्तर देत सुनावलं होत.



राजीव त्यावेळी मॉडेलिंग इंडस्ट्रीतील एक परिचित चेहरा होता आणि तो मनीषा कोइरालाचा मित्र होता. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं की, राजीव मूलचंदानीने ऐश्वर्या रायला सोडून मला प्रपोज केलं आहे. . ऐश्वर्या रायसाठी ही मोठी गोष्ट होती, कारण त्यावेळी ऐश्वर्याच्या करियरची नुकतीच सुरूवात होत होती. हे प्रकरण 1994 मधलं आहे.


यानंतर 1999 साली एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या रायनेही या संपूर्ण घटनेवर आपली बाजू मांडली आणि म्हणाली की, राजीव तिचा खूप चांगला मित्र आहे आणि या व्यतिरिक्त आमच्यात कधीच कसलाचं संबध नव्हता.


ऐश्वर्याने असंही म्हटले होतं की, दोन महिन्यांनंतर राजीव आणि मनीषा विभक्त झाले, आता प्रत्येक महिन्याला मनिषा वेगळ्या मुलाला डेट करते, एवढंच नाही तर मनीषाने त्यावेळी असंही म्हटलं होतं की, तिने राजीवने  ऐश्वर्याला लिहिलेलं पत्र पाहिले आहे. यावर ऐश्वर्या म्हणाली, हे सगळं ऐकून मला धक्का बसण्यापेक्षा काही कमी नाही.


हे सगळं  ऐकून मी खूप रडले आहे. ऐश्वर्या पुढे म्हणाली होती की, मनीषाने रेखा आणि श्रीदेवी यांच्यासारख्या सीनिअर्सची कधी कदर केली नाही तर तिच्या समोर मी काय चिज आहे? तरीही मी म्हणते ती कायम आनंदी रहावी आणि तिच्या आयुष्यात सेटल व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.