औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने मृत पत्नीसोबत 500 किलोमीटरचा ट्रेनने प्रवास केल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे या घटनेची सहप्रवाशांना देखील कल्पना नव्हती. पती सुद्धा पत्नीची मृत्यू झाल्याची माहिती नव्हती. मात्र नंतर ट्रेनमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर या घटनेचा उलगडा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पती आपल्या आजारी पत्नीला घेऊन लुधियानाला उपचारासाठी जात होता. यावेळी ट्रेनमध्ये काही अंतरावर पोहोचताच तिची तबीयत आणखीणच खालावली होती. या दरम्यानचं तिने पतीच्या मांडीवरच प्राण सोडला होता. मात्र याची पतीसह सहप्रवाशांना कल्पनाच नव्हती. पतीला ती झोपली असल्याचे वाटल्याने त्याने तिच्यावर चादर ओढली होती. असा साधारण त्याने 500 किमी अंतर पार केले होते. 


टीसी चढला ट्रेनमध्ये 
प्रवासादरम्यान गाडी महत्त्वाच्या स्थानकात पोहोचताच टीसीने ट्रेनमध्ये प्रवेश केला होता. यावेळी टीसीने सर्व प्रवाशांची तिकीट तपासण्यास सुरुवात केली. तिकीट चेक करता करता टीसी त्या पतीजवळ पोहोचला होता. टीसीने पतीला तिकीट विचारले व पतीला उठवण्यास सांगितले. यावेळेस पतीला जाग करताना त्याला पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. 


मृतदेहाच शवविच्छेदन
टीसीने स्थानकातील जीआरपीएफला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानकात मृतदेह उतरवण्यात आला. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते.याप्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.


दरम्यान नकळत एका पतीने मृत पत्नीसोबत 500 किलोमीटर प्रवास केल्याने ही घटना चर्चेत आली आहे. बिहारच्या औरंगाबादमधील ही घटना आहे. या घटना एकूण अनेकांना धक्का बसला आहे.