नवी दिल्ली : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांनी लोकसभेत माफी मागितली आहे. आपण केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. माझ्या या वक्तव्यामुळे कोणाला ठेस पोहचली असेल तर माफी मागते. पण संसदेत माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. हे निंदनीय आहे. महात्मा गांधींनी देशासाठी केलेल्या कामाचा मला आदर आहे. याच संसदेतील एका सदस्याने मला सार्वजनिकपणे दहशतवादी म्हटलं होतं. माझ्या विरोधात कोर्टात कोणताच आरोप सिद्ध झाला नाही. तरी देखील माझा अपमान केला गेला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण?
लोकसभेत एसपीजी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी गोडसेचं उदाहरण देत त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली असं सांगत असताना साध्वी यांनी त्यांना तुम्ही एका देशभक्ताचं उदाहरण नाही देऊ शकत असं म्हटलं होतं. 


साध्वी प्रज्ञाच्या विधानावर विरोधकांनी त्यांचावर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील ट्विट करत पंतप्रधानांपुढे प्रश्न उपस्थित केले.


निवडणुकीच्या दरम्यान ही नाथूराम गोडसेला देशभक्त म्हटल्यामुळे पंतप्रधान मोदींनी यावर नाराजी दर्शवली होती. साध्वी प्रज्ञा यांनी तेव्हा माफी मागितली होती. पण पंतप्रधान मोदींनी त्यांना मनातून कधीच माफ नाही करु शकत असं म्हटलं होतं.