रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती के सी वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावरून दिलीय. यानंतर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.



अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के सी गोपाल स्वत: शरद पवार यांच्याशी पुढची चर्चा करणार असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. यासाठी काँग्रेसचे हे महत्त्वाचे नेते मुंबईसाठी रवाना झालेत.