महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ल्यावरील रहस्यमयी तलाव; संशोधकांनाही उलगडले नाही याचे रहस्य

महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; आजही अभेद्य आणि अंजिक्य आहे. महाराजांनाही जिंकता आला नाही किल्ला. 

Oct 01, 2024, 00:07 AM IST

Murud Janjira Fort  : अथांग समुद्र आणि समुद्राच्या मध्यभागी भक्कमपणे दिमाखता उभा असलेला अभेद्य किल्ला पाहताक्षणीच अंगावर रोमांच उभा राहतो. रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करूनही आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही.  मुरूड जंजीरा किल्ला हा अजिंक्य किल्ला आहे.

 

1/8

350 वर्षांहूनही अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला सर्वांसाठी आव्हानात्मक राहिला. या किल्ल्याला आता जवळपास 500 वर्ष  झाली आहेत. अनेक हल्ले, आक्रमणं झेलूनही हा किल्ला आजही हा किल्ला अजेय पराक्रमाची साक्ष देत आहेत.   

2/8

किल्ल्यावर 60 फूट खोल नैसर्गिक गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत. चहुबाजूने समुद्राचे खारे पाणी असताना या तलावाचे पाणी गोड का? याचे रहस्य अद्याप संशोधकांना उलगडलेले नाही. 

3/8

या किल्ल्यावर एक भूमिगत भुयार आहे. रस्त्याप्रमाणे असणारे हे भुयार म्हणजे एक गुप्त मार्ग होता. समुद्राखाली 50 ते 60 फूट खोल राजपुरी गावापर्यंत हा रस्ता आहे. बाले किल्ला हे देखील मुरूड जंजीरा किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे.   

4/8

समुद्रात मोठ्या दिमाखात उभा असेलला हा भव्य किल्ला किनाऱ्यावरुनच पर्यटकांना आकर्षित करतो. किल्ल्याचे बांधकाम अतिशय भक्कम आणि मजबूत आहे. शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं. त्यामुळेच त्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी तब्ब्ल 8 वेळा प्रयत्न केले होते. 

5/8

या किल्ल्यावर  22 सुरक्षा चौक्या आहेत. हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली. मजबूत बांधकाम, अभियंत्रीकी तंत्रज्ञानही फेल ठरेल अशी रचना, देखणं स्थापत्य  आणि अत्यंत अचूक जागा यामुळे हा किल्ला जिंकणे कुणालाही जमले नाही.   

6/8

अलिबागच्या मुरुड बेटावर  मुरूड जंजीरा किल्ला बांधण्यात आला. 22 एकर परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. समुद्र किनाऱ्यापासून मुरुड-जंजिरा किल्ला 90 फुट उंचीवर आहे. या किल्ल्याच्या पायाची उंची 20 फुट एवढी आहे.   

7/8

या किल्ल्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे प्रवेशद्वार. या किल्ल्याचे प्रवेशद्वार  अशा पद्धतीने बांधण्यात आले की किल्ल्याच्या जवळ पोहचले तरी प्रवेशद्वार दिसत नाही. यामुळेच समुद्रात किल्ल्याच्या अवतीभोवती कितीही फेऱ्या मारल्या तरी प्रवेशद्वार कुठे आहे हे लक्षात येत नाही. यावरुनच या किल्ल्याची सुरक्षा किती मजबूत आहे हे लक्षात येते.  

8/8

मुंबईपासून दक्षिणेला 165 किलोमीटर अंतरावर समुद्रात हा भव्य किल्ला बांधण्यात आला आहे. बंदरावर उतरल्यावर शिडाच्या होडीने किल्य्यावर जावे लागते. होडीतून प्रवास करताना किल्ला जस जसा जवळ येतो तसचं किल्याची भव्यता अगदी स्पष्टपणे दिसू लागते.