अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रखडल्या होत्या. तर १ ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू देखील होणार होते त्याचे वेळापत्रक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जाहीर सुद्धा केले होते. मात्र गेल्या १५ दिवसापासून विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यासाठी लेखणी बंद आंदोलन पुकारले असल्याने अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पत्र काढलं या परीक्षेला तात्पुरती स्थगिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाच जिल्ह्यातील ७० हजार विद्यार्थ्यांना करावी आता पुन्हा परीक्षेची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुन्हा हिरमोड झाला असून यावर्षीच शैक्षणिक सत्र धोक्यात जाणार की काय अशी चिंता विद्यार्थ्यांना आता सतावत आहे. 


कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे परीक्षाच रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असावी कारण कर्मचारीनी आंदोलन केल्याने परीक्षा विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. 
त्यामुळे परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असतांना परीक्षेचे काम न झाल्याने परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला तर आता केव्हा विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील व केव्हा निकाल जाहीर होतील हा प्रश्न उपस्थित झाला आहे.



नागपूर विद्यापीठाचा निर्णय 


कोरोनामुळे अगोदरच लांबलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. विद्यापीठ  कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. मंगळवारी रात्री यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आले.


यामुळे विद्यार्थ्याना नाहक मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यापीठाने  मोबाईलवरुन परीक्षा देण्यासाठी विशेष अ‍ॅपदेखील विकसित केले होते. यासंदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आली होती.



कर्मचाऱ्यांचे आंदोलन 
नागपूर विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेशपत्रच पोहोचले नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी प्राचार्य फोरमनेदेखील केली होती. 


गोंधळात परीक्षा शक्य नाही
विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी दोन दिवसांआधी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तयार करून ते महाविद्यालयांना पाठविले होते.मात्र कर्मचा-यांचा कामबंद आंदोलनामुळं त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत होता. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या  कामबंद आंदोलनामुळे परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे आंदोलन मिटल्यावरच परीक्षा घेण्यात येतील,अशी माहिती  परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांनी सांगितलं.