ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप आमदार आशिष शेलार यांना ठाण्यातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, हे दोघे खासदार कपिल पाटील यांच्या मुलाच्या लग्नासाठी ठाण्यात आले होते. ठाण्याच्या वेशीवर असलेल्या कोपरी पुलाचे काम सुरु आहे. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दरदिवशी होते. दररोज या वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसत असे मात्र आज याचा फटका चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे आमदार आशिष शेलार यांना बसला असल्याने या दोघांना तीव्र नाराजी व्यक्त केली.


मेट्रोचे काम जोरात 


दरम्यान वर्षाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिक घरच्या बाहेर पडले असल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी झाली असल्याचे ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ठाण्यात मेट्रोचे जोरदार काम सुरु आहे. तसेच अनेक भागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरु असल्याने कार्यक्रमासाठी पोहचण्यासाठी फडणवीस तसेच शेलार यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान कोपरी येथील नगरसेवक भरत चव्हाण यांच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी हजेरी लावल्यानंतर पुढ्याच्या कार्यक्रमासाठी निघून गेले.