नितेश महाजन, झी मीडिया, जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला तडे जाऊन पाण्याची गळती होत असल्याची बातमी बुधवारी 'झी २४ तास'ने दाखवली होती. या बातमीची दखल घेऊन जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तात्काळ धरणावर जाऊन होत असलेल्या गळतीची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी धरणापासून निर्माण होणाऱ्या समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धरणक्षेत्रात खोदल्या जाणाऱ्या विहिरीत ब्लास्टींग घेतल्याने या धरणाच्या भिंतीला तडे गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी भेट गळतीची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ धरणातील पाणी गळतीबाबत उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.


तिवरे धरण फुटल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश


सध्या धामणा धरण ९० टक्के भरले असून धरणापासून कोणताही धोका नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. धरणाच्या सांडव्यातील भिंतीतून मोठी गळती होत असल्याने नदीच्या परिसरातील चार गावातील नागरीकांना खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धामणा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली होती. प्रकल्पातील वाढत्या पाणी साठयामुळे धामणा धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला मोठे तडे गेले होते. थेट या भिंतीतूनच पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.