मुंबई : गेल्यावेळी दिलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक घोटाळे झाले. मात्र यावेळी गरजू शेतक-यांना कर्जमाफी मिळावी तसंच एकही गरजू सुटणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत. 


पुण्यातील महसूल परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. कर्जमाफीत एकही चुकीचा माणूस येणार नाही या पद्धतीने अंमलबजावणी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.