COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पुण्यातल्या नाना पेठेतील आझाद आळीमधे जुन्या वाड्याला आज दुपारी आग लागल्याने एकच खळबळ उडाली...भरवस्तीतल्या या वाड्याला आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली वाड्या मध्ये राहणारे रहिवाशी आग लागल्याने  तातडीने बाहेर पडले आणि अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली.. वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या या परिसरात अतिशय दाटीवाटीने घरं असल्याने आग पसरू नये याची काळजी घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगी वर नियंत्रण मिळवत एक तासात आग विझवली दरम्यान आगी मुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला वाड्यातील नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आल परिसरातल्या इतर नागरिकांनीही घराबाहेर धाव घेतली आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यानी गर्दी केली होती..


या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही मात्र आगीत वाड्याच मोठं नुकसान झालंय... आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करत आग विझवल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला...