मुंबई : मुंब्रा बायपासचं संथ गतीने सुरु असलेले डागडुजीचे काम ,आणि त्यामुळे या रस्त्यावरील जडवाहन नाशिक हायवे वरून वळवण्यात आली. त्यात नाशिक हायवेवर पडलेले खड्डे आणि आज वीक ऍण्ड त्यामुळे पिकनिकच्या मूडमध्ये असलेले अनेक लोक आपल्या खाजगी गाड्या घेऊन बाहेर पडले आहेत. या तिन्हीही गोष्टींमुळे नाशिक हायवे वर वाहतूक कोंडी झालीयं.


प्रवाशांमध्ये नाराजी


ठाणे पासून ते खारे गाव टोल नाक्या पर्यंत म्हणजेच जवळपास चार किलोमीटर पर्यंत रांगच रांगा वाहनाच्या दिसत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशी वर्गात प्रचंड नाराजी आहे. महत्वाचे म्हणजे मुंब्रा बायपासचा काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे असे प्रवाशी सांगत आहेत.