गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक पिके पाण्यात गेली आहेत. भारतीय हवामान खात्याने गणपती बाप्पाच्या आगमनासोबत काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानेही पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


पुढचे 3 दिवस कसं असेल वातावरण? 


गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. हवामान सतत बदलत आहे. मात्र दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किनारपट्टी भागात पावसाची तीव्रता वाढणार असून घाटांवरही येत्या ३ दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.


मराठवाडा, विदर्भात पाऊस 


मराठवाडा, विदर्भात पावसाची स्थिती कायम राहणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड, हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगर, जालन्या येथेही मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.


कोकण घाटात पाऊस 


कोकण आणि घाटपट्ट्यात या जिल्ह्यांसोबतच मुंबई आणि पुण्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुण्याबरोबरच रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाडा, विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.