Honour killing in sambhaji nagar : आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून सासर्‍याने आपल्या जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगरात समोर आलीय. अमित मुरलीधर साळुंखे असं या तरुणाचं नाव असून तो शहरातील इंदिरानगर भागात राहत होता. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे त्याची लहानपणाची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांनी प्रेम विवाह देखील केला होता मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हा राग मनात धरून 14 जुलै रोजी अमितच्या पोटात चाकूचे वार केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटात चाकूचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला 11 दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपीला अटक झालेली नाहीय. पोलीस आरोपी साऱ्याचा शोध घेताय. याप्रकरणी 2 आरोपी असून त्यांच्या मागावर पोलिसांची 2 पथके कार्यरत आहेत. आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू, असे डीसीपी नवनीत कावत यांनी म्हटलंय.


काही वर्षांपूर्वी आलेल्या 'सैराट' या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऑनर किलिंगची चांगलीच चर्चा रंगली. खोट्या प्रतिष्ठेसाठी कुटुंबातील तरुणाने आपल्या बहिणीची तिच्या सासरी जाऊन हत्या (Murder) केल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. ही मानसिकता आजही समाजात कायम आहे. याचीच प्रचिती संभाजीनगरमध्ये पहायला मिळाली. समाजाच्या नजरेतून जात नावाचं भूत अजूनही उतरलं नसल्याने महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं कसं? असा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे.