मुंबई : राज्यात येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार किंवा खातेबदलाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची जुलैमध्येच विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपली आहे. त्याला आता सहा महिने होत आहेत. त्यामुळे दीपक सावंत यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक लवकरच अपेक्षित आहे. कृषी खात्याचा अतिरिक्त भार सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. तो दुसऱ्या कोणाकडे सोपवला जाऊ शकतो. काही महामंडळाच्या नेमणुकाही होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका काही दिवसांवर आहेत. त्य़ामुळे हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असू शकतो. दुसरीकडे एकनाथ खडसे यांचं कमबॅक होणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.


राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे सध्या वेट आणि वॉचची भूमिका घ्यावी लागेल.