मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील आदेशांमध्ये राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले होते. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परस्पर आदेश काढल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. सरकार मुख्यमंत्री चालवतात की अधिकारी हेच कळत नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारी यासंदर्भतील निर्देश जारी करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवले पाहिजे; चव्हाणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


आज राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. या सूचनांमध्ये स्थानिक पातळीवर परस्पर कोणतेही बदल करू नका, असे बजावण्यात आले आहे. आज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागेल, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.


जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा, मंत्री व अधिकाऱ्यांना कामाला लावा- शरद पवार


 


स्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते. काही दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर कोविड सेंटर उभारण्याच्या मुद्द्यावरुन मुंबईच्या महापौर आणि आयुक्त इकबाल चहल यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याने वादंग निर्माण झाला होता. त्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते. हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आल्याचे सांगितले जाते. एकूणच आता प्रशासनावर वचक ठेवून सर्व सूत्रे आपल्याला हातात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.