मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली. राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दुष्काळाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सरकारकडे करण्यात येणाऱ्या मागण्यांची माहिती दिली.


शरद पवार यांची पत्रकार परिषद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- राज्यात दुष्काळी स्थिती परतीचा पाऊस अनेक जिल्ह्यात पडला नाही त्यामुळे निर्माण झाली आहे
- दुष्काळात पिण्याचं पाणी, लोकांना रोजगार, पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या याची व्यवस्था सरकारला करावी लागते
- दुष्काळात फळबाग गेली तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते
- या दुष्काळात राज्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे
- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिष्टमंडळासह त्यांना भेटतील
- आमच्या काळात काय उपाययोजना केल्या जातील याची माहिती दिली जाईल
_ आमचे सरकार असताना फळबागा वाचवण्यासाठी अनुदान दिले होते
- फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे ही मागणी
- चारा छावण्यात पूर्वी सरसकट जनावरं घेतली जात होती, आता पाचच जनावरं घेतली जातात ही अट काढावी
- चारा छावणीत ९० रुपये जनावारे मागे दिले जातात, ते वाढवावे
- सध्या जनावरांना ऊसाचं वाडं चारा म्हणून दिलं जातं, त्याबरोबर हिरवा चारा, पेंड उपलब्ध करून द्यावी 
- सर्व प्रकारच्या वसुली थांबवण्याचा निर्णय सरकारने घ्यावा
- शेतकर्यांने घेतलेलं कर्ज तो फेडू शकत नाही त्यामुळे कर्जमाफी आणि पुनर्गठण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल
- जूनमध्ये शालेय, महाविद्यालयीन प्रवेश सुरू होतील त्यामुळे प्रवेश फी माफी द्यावी
- विद्यार्थ्यांना दोन वेळ जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही दुष्काळात घेतला होता, तसा निर्णय घ्यावा


गडचिरोलीचा प्रकार चिंताजनक


- नक्षल प्रश्न आजचा आहे असे मी म्हणत नाही, मी मुख्यमंत्री असतानाही हा प्रश्न होता
- पण हा प्रश्न सोडविण्यासाठी कायदा सुव्यवस्थेबरोबर विकासही करायला हवा
- आम्ही असताना या भागातील विकासाकडे लक्ष दिले होते
- मात्र या सरकारने या भागातील विकासाकडे दुर्लक्ष केलं आहे
- पूर्वी राज्याचे गृहमंत्री सांगली जिल्हातील असूनही गडचिरोलीचे पालकमंत्री स्वीकारले आणि ते वारंवार गडचिरोलीला जात होते
- मात्र आजचे गृहमंत्री केवळ पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी गडचिरोलीला जातात
- दुष्काळात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, तालुका अध्यक्ष, विद्यार्थी संघटना काम करतील
- निवडणूक आयोगाकडे आम्ही फोनवर माहिती द्यायचो दुष्काळातील कामं करायची आहेत, निवडणूक आयोग दोन ते तीन तासात परवानगी द्यायचे 
- निवडणूक आयोगातील नियमावली दुष्काळी कामात आड येत नाही
- मी दुष्काळी दौर्‍यावर गेलो नसतो तर सरकारच्या बैठका झाल्या नसत्या, मंत्र्यानी दौरे केले नसते 
- आता तडफडणारे पशुधन वाचवा


छगन भुजबळ 


- सिन्नरमध्ये २२ जनावरे दगावल्याच्या घटनेवर भुजबळांचे भाष्य
- नाशिकच्या भागात पाण्याची तीव्र टंचाई
- जनावरांच्या पाण्याचा हिशोब नाही, त्यांना पाणी नाही
- अक्षरशः शेतात माती खाताना मी जनावरं बघितली आहेत
- सिन्नर, नांदगाव या परिसरात टँकर कमी पडतायत, पाणी पोहचत नाही
- सिन्नरमध्ये पाण्याअभावी जनावरं मेली, आम्ही त्यांना तातडीने उपाययोजना करायला सांगितल्या आहेत
- जर तातडीने पाणी उपलब्ध करून दिलं नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल
 जलयुक्त शिवारमुळे राज्यात क्रांती झाली असं सरकार सांगतं
- त्यांच्याएवढं मला समजत नसेल
- पण जलयुक्त शिवार काय आहे ते मला माहित आहे
- या सरकारने यापूर्वीचे सर्व कार्यक्रम रद्द केले आणि जलयुक्त शिवार योजना राबवली
- जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या अहवालानुसार जलयुक्त शिवार ही फायद्याची योजना नाही